![]() |
Pioneer Bank Scheme । अग्रणी बँक योजना |
■ शिफारस
डॉ.धनंजयर गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय पत समिती अभ्यास गटाने राष्ट्रीयीकृत बँकांना क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण लागू करण्याची शिफारस केली.【सविस्तर अर्थ - आपला शाखा विस्तार करीत असतांना राष्ट्रीयीकृत बँकांनी विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रीत करावे त्याचप्रमाणे त्या क्षेत्रात बँकिंगच्या सुविधाची वाढ करून त्या क्षेत्राचे संगोपन करून आर्थिक विकास घडवून आणावा.】 1969 मध्ये या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी श्री.एफ.के.एफ.नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली बँक व्यावसायिकांची समिती 【Committee of Bankers】 स्थापन करण्यात आली. नरिमन समितीने गाडगीळ यांचा क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण मान्य करून त्याला मूर्त रूप दिले आणि अग्रणी बँक योजना तयार केली.
■ सुरुवात
1969 च्या अखेरीला RBI ने योजना स्विकारून तिची अंमलबजावणी देशातील 338 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली.
■ योजना
देशातील 338 जिल्हे,स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिच्या सहयोगी बँका,14 राष्ट्रीयीकृत बँका व 3 खाजगी बँकांमध्ये वाटून देण्यात आले. मात्र,मुंबई,कलकत्ता,मद्रास ही महानगरे आणि दिल्ली,पॉडीचेरी व गोवा हे केंद्रशासित प्रदेश यांना ही योजना लागू करण्यात आली नाही. अशा रितीने एक जिल्हा एका बँकेला दत्तक म्हणून देण्यात आला.त्या बँकेला त्या जिल्ह्याची अग्रणी बँक म्हणून दर्जा देण्यात आला. असा दर्जा मिळाल्यानंतर त्या अग्रणी बँकेने त्या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी पुढाकार घेऊन त्या जिल्ह्याचे पतधोरण तयार करून संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी अग्रणी बँकेवर सोपवण्यात आली.
■ अग्रणी बँकेची कार्ये
जिल्ह्याचे सर्वेक्षण करून जिल्ह्याची पत गरज ठरविणे. बँक शाखा कोठे सुरू करता येतील याचा शोध घेऊन सल्लामसलत समित्याची स्थापना करून पुढीलप्रमाणे कार्य घडवून आणणे आणि जिल्ह्यातील सर्व व्यापारी बँका, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांमध्ये समन्वय. घडवणे त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील बँकांमध्ये समन्वय,अल्पकालीन व दीर्घकालीन कर्ज पुरवठ्यामध्ये समन्वय,जिल्ह्यातील विकास कार्यांमध्ये गुंतलेल्या सर्व संस्थांच्या कार्यांमध्ये समन्वय. 1976 च्या उच्चाधिकारी समितीच्या शिफारसींनुसार अग्रणी बँकांवर 3 वर्षाचे जिल्हा पतधोरण 【District Credit Plans】 तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली. हे धोरण सर्वसमावेशक स्वरूपाचे असून त्यात जिल्ह्यातील बँकांसाठी गटनिहाय, क्षेत्रनिहाय योजनानिहाय आणि बँकनिहाय कर्ज पुरवठ्याचे लक्ष ठरवले जाते.
भारत सरकारच्या सुचनेनुसार एप्रिल 1989 मध्ये अग्रणी बँक योजनेंतर्गत क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण लागू करण्यात आला.
■ महाराष्ट्रातील अग्रणी बँका 【33 जिल्हे】
» स्टेट बँक ऑफ इंडिया
बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नंदुरबार
» सेंट्रल बँक ऑफ इंडिया
अकोला, अमरावती, सांगली, धुळे, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर, वाशीम, बुलढाणा
» बँक ऑफ इंडिया
नागपूर, भंडारा, चंद्रपुर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया.
» बँक ऑफ महाराष्ट्र
औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे, जालना
■ अग्रणी बँक सध्याची स्थिती
सध्य स्थितीत फेब्रुवारी 2013 पर्यंत अग्रणी बँक योजना देशातील 622 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी आहेत. फेब्रुवारी 2013 मध्ये SBI अथवा SBI च्या सहयोगी बँका सर्वात जास्त म्हणजेच एकूण 204 जिल्ह्यांमध्ये अग्रणी बँक म्हणून कार्य करत आहेत.
■ उषा थोरात समिती
भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अग्रणी बँक योजनेच्या परीक्षणासाठी एका उच्चाधिकार समितीची स्थापना केली असून या समितीने 20 एप्रिल 2009 रोजी आपला अहवाल सरकारला सादर केला.
वरील अर्थशास्त्र विषयावरील अग्रणी बँक योजना या टॉपिकवर आधारीत माहिती आपणास कशी वाटले तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा?
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!